चार क्षण ऊन

चार क्षण पाऊस
चार क्षण ऊन

भरजरी शालीचे
सोनेरी धागे उसवून
मी विणले हे  सक्त धागे कसे कोणास ठाऊक

थंडगार वाऱ्याची झुळ्ळूक आली
पावसाचा शिडकावा घेऊन
मी मात्र पाहीला   
घोंघावणारा वारा आणि लख्खं  ऊन

पाखरांची साद आली
मंजूळ क्षणी गात
मी मात्र ऐकले शांत तटस्थ आगाज...

अशाही रुक्ष वनात तू शोधलेस
दवबिंदू नवलाइचे
तुझ्या पोरकट स्वप्नाने केले
सारे सोहळ्याचे....

चार क्षण पाऊस
चार क्षण  ऊन
दे ना तुझे स्वप्न
देईन माझ्या उशाशी ठेवून...

7 Comments:

क्रांति said...

surekh!!

Mandar Joshi said...

khup sundar kalpana ahe !!

HAREKRISHNAJI said...

सुरेख

Unknown said...

I really liked this one… Many interpretations are possible and that’s the beauty of this poem. So endearing and touching…….

BinaryBandya™ said...

sunder

Harshad Godbole said...

प्रत्येक कवितेचा असा एक मुड असतो.तसा एक यात जाणवत राहतो,असे दुसर्‍यापर्यंत पोचणे अवघड असते असे मला वाटते.
खुपच छान,
अभिनंदन.

Anuja Khaire said...

धन्यवाद!!
क्रांति, मंदार,HAREKRISHNAJI,दिपाली,Binary Bandya, आणि Harshad.

Post a Comment

कागदाचं एक पान