विठ्ठल विठ्ठल आळवी

विठ्ठल माझ्या ध्यानी मनी
सावळे रूप मनोहारी

किती गुण गायले तरी
देवा वीट नाही चित्ती

सुखे दु:खे नाम मुखी
विठ्ठल  विठ्ठल  आळवी

तुझ्याच  पायी स्थैर्य संसारी
कोण मागणे आणखी नाही

बा विठ्ठला अशीच कृपा ठेवी
मी भाबडा जीव तुझे गुण गाई !  

भाव डोळ्यात रिते झाले

भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

का, केव्हा, कसे
मो शोधत राहिले

कवितेचे पान पुन्हा गहिवरले
सुन्न मनाला आळवू लागले

त्या दिशांचे तराणे
क्षितिजावरच विरले
शब्दांना  खूप वळविले
पण गीत खरे पापणीतून निखळले

शब्द तिथेच थिजले, लाजले
कारण भाव डोळ्यात रिते झाले
नि अश्रु ओसंडून आले

कागदाचं एक पान